Adsense

Friday, March 27, 2020

आजची सकाळ

सकाळी सकाळी उठून जरा घराबाहेर पडून  काय चाललंय बघूया म्हणून दार उघडलं तर काय आश्चर्य दारात छत्रपती शिवाजी महाराज उभे . त्यांनी माझ्यावर तलवार रोखली आणि म्हणाले खबरदार जर घराबाहेर पडलास तर शत्रू महाभयंकर आहे . सध्या फक्त गनिमी कावा . मी घाबरून महाराजांना मुजरा करून दार लावून घेतलं . रोगाच्या भयाने त्रस्त झालो अस्वस्थ झालो . तितक्यात बाबा आमटे आले माझ्याबाजूला . सोफ्यावर बसले .  त्यांनी मायेने हाथ फिरवला आणि म्हणाले अरे रोगाला घाबरून काय होणार आहे . फक्त त्याला नीट जाणून घेता आलं म्हणजे मिळवलं . मला थोडं हायसं वाटलं . मी म्हटलं तुम्ही असायला हवे होतात बाबा आता . ते म्हणाले मी नसलो तरी माझ्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं आहेत कि डॉक्टर आणि सेवकाच्या रूपात . तू बिनधास्त रहा . फक्तं त्यांच्यावरचा भार वाढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या . असं म्हणून बाबा आमटे गुप्त झाले . आता २१ दिवस घरी बसून काय करायचं याचा मी विचार करत होतो तोच गाडगे महाराजांनी मला झाडू ने झोड झोडलं . म्हणाले अरे मी ओरडून ओरडून सांगितलं रे कचरा साफ करा मनाचा आणि परिसराचा .. केलीत ना घाण . आता निदान तू तुझ्या घरातला तरी कचरा काढ . बाहेरचा  कचरा काढणारी माणसं राबतायत तुमच्या साठी तुम्ही कचरा केला नाहीत तरी पुष्कळ ..गुमान झाडू घेतली आणि कचरा काढायला लागलो . तितक्यात सावरकर आले म्हणाले आता कळलं कैद म्हणजे काय असते . पण घाबरू नकोस या कठीण काळात  तू तुझ्यातल्या लेखणीला आणि विचारांना खतपाणी घाल .. २१ काय ५० दिवस पण सहज जातील . मी त्यांना विचारलं पण खाण्याचं काय तितक्यात गांधीजी आले म्हणाले गरजा कमी कर आवश्यक तेवढंच खा . आणि सावरकर गांधीजी एकत्र हसत हसत निघून गेले . मला कळलं नाही मग आम्ही का भांडतोय आजही यांच्या नावाने .मला कळलं हाच तो काळ शहाणं होण्याचा . मी खिडकीत जाऊन त्यांचे आभार मानावे म्हटलं तर . दाभोळकर खिडकीत उभे त्यांनी मला बंदुकीची गोळी काढून दाखवली म्हणाले हीच ती अविवेकाची गोळी . तू विवेक घालवून बसू नकोस विज्ञानावर विश्वास ठेव एक दिवस नकीच यातून मार्ग काढशील .

मी म्हटलं चला आता या एकवीस दिवसात यांच्या विचारांची सोबत मला नकीच साथ देईल …   

महेंद्र तुकाराम कदम .

Tuesday, March 24, 2020

पुस्तके

कोणाला घरी करमत नसेल तरी खालील लिंक चा वापर करा आणि पुस्तके वाचा. पण अजिबात घरा बाहेर नका पडू. काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या परिवाराची.

1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जंजिरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

*तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल*

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

Monday, March 23, 2020

लहान होत तेच बर होत....

*लहान होत तेच बर होत....*
लहान होत तेच बर होत,
ना कशाची काळजी,ना कशाची चिंता होती
बॅट- बॉल, विटी- दांडू हीच आमची दुनिया होती....🤗

ना मनात पाप,ना शिक्षणाचं ओझ    होत,
मोठ होऊन काय व्हायचंय हे तेव्हा कुणी ठरवल होत,😅
नेहमी वाटायचं मोठ व्हावं मोठ्यांसारख वागावं
पण आता कळतंय, लहान होत तेच बर होत....😔

वय वाढलं,ओझ वाढलं दबला खाली खांदा
दबलेल्या खांद्याखाली बालपणाचा पार चुराडा झाला,
मोठ होऊन जर अपेक्षा पूर्ण करण्याचं काम होत,
तर लहान होत तेच बर होत...😔

या धावपळीच्या जीवनात त्या आठवणी पुन्हा ताज्या होतायेत
जेव्हा आम्हाला काही काम नव्हतं🙃
आता वाटतंय *लहान होत तेच बर होत....* 😔
  - ओंकार वाघ(बारामती)







स्वर्ग आणि नरक

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
चमचा तोंडा पर्यंत पोहचतच नव्हता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
" लांब दांड्याच्या चमच्याने स्वतः खाता आले नाही तरी दुसऱ्याला भरवता येते
या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत "

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील...
👍👍👍

Tuesday, March 17, 2020

इटलीचा जगाला संदेश

*खूप महत्वाचे*

इटलीचा जगाला संदेश
उशीर होण्यापूर्वी पावलं उचलण्यास  सांगितले:

इटलीचे एक पत्र,
सर्वांसाठी शांती,
आम्ही इटलीमध्ये राहतो - मिलान,
  या कठीण दिवसांमध्ये मी तुमच्या बरोबर आमच्या चुका सामायिक करीत आहे आणि समजावून सांगणार आहे की, “येथे जीवन मिलनमध्ये कसे आहे” आणि मला वाटते की आम्ही येथे ज्या चुका केल्या आणि त्यांचे झालेले दुष्परिणाम जगणे जाणून घ्यावेत.
  आम्ही सध्या अलग ठेवण्यात आलेलो आहोत. आम्ही घरातून बाहेर पडत नाहीत,
पोलिस सतत कार्यरत आहेत आणि घराबाहेर कुणी आल्यास त्याला अटक करत आहेत.
  सर्व काही बंद आहे! व्यवसाय, मॉल्स, स्टोअर्स, शाळा रस्ते सर्व निर्जन आहे.
  आमचे नष्ट होत असल्याची जाणीव होत आहे !!
  इटली, जगण्यात रंगत असलेला देश, एका क्षणापासून दुसर्‍या क्षणामध्ये परिवर्तित झाला आहे जणू तो युद्धाचा देश आहे.
  जन्मभरात आम्ही कधी असला विचारचं केला नव्हता
  लोक गोंधळलेले आहेत, दु: खी आहेत, चिंताग्रस्त आणि असहाय आहेत, त्यांच्यावर ही वेळ कशी आली आणि हे संपूर्ण भयानक स्वप्न कधी संपेल हे बर्‍याचदा समजत नाही.
     आमची सर्वात मोठी चूक अशी होती की पहिल्या हिटच्या वेळी आम्ही नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगत होतो, काम, मनोरंजन आणि साथरोगामुळे दिलेल्यासुट्टीच्या कालावधी आम्ही रस्त्यावर उतरुन मित्र आणि मेजवानीत एकत्र घालवला
  आमच्यातील प्रत्येकजण चुकीचा होता आणि म्हणूनच आम्हांवर ही वाईट वेळ आलेली आहे!
  आम्ही जगाला विनंती करतो की, सावधगिरी बाळगा, हा हास्य किंवा विनोदाचा विषय नाही.
  आपले प्रियजन, आपले आईवडील आणि आजी आजोबा यांचे रक्षण करा! हा रोग त्यांच्यासाठी धोकादायक आहे.
  येथे दररोज सुमारे 200 लोक पटापट मरत आहेत, कारण मिलानमधील एवढी औषधीही उपलब्ध नाही (मिलन येथे जगातीसर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या),परंतु प्रत्येकासाठीव आता वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे!
  कोण मरतील हे डॉक्टरचं ठरवतात!
हे केवळ सुरुवातीस आमच्या उदासपणामुळेच झालेलं आहे, आम्ही परिस्थितीची पर्वा न करता नेहमीप्रमाणे आपले आयुष्य चालू ठेवण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता!
  कृपया, आमच्या चुकांमधून तुम्ही शिका, आमचा एक छोटासा देश आहे जो एका महान शोकांतिकेच्या काठावर उभा आहे, ह्या चुका तुम्ही करू नका

आता चांगले ऐका ,,, 🙏 1.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
2.सार्वजनिक ठिकाणी काही खाऊ नका
3.यावेळी घरीच रहा!
4.आरोग्य मंत्रालयाची/प्रशासनाची मार्गदर्शक तत्त्वे ऐका (ते विनोद करीत नाहीत!).
5.प्रत्येक व्यक्तीपासून एक मीटर अंतर ठेवा,
6.जवळ येऊ नका,
7.गोंधळ हकिंवा आणि गर्दी होऊ देऊ नका.
8.पूरक आणि प्रतिबंधात्मक उपचार मिळवा आणि इतरांच्या चुका जाणून घ्या.
9.आम्ही शिफारस करतो की आपण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी व्हिटॅमिन सी घ्या.
10. शासन आणि प्रशासन यांना साथीचा प्रसार रोखण्यात मदत करा ...

   आमचा संपूर्ण देश इटली एकांतवासात आहे, म्हणजे 60 दशलक्ष लोकांना अलग ठेवण्यात आलेले आहे!!
  जर आम्ही सुरुवातीपासूनच सूचना ऐकल्या असत्या तर हे टाळता आले असते.
  स्वतःची आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या जीवनाची काळजी घ्या ❤❤

सामाजिक जाणिवेतून हा लेख फॉरवर्ड करावा


फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...