Adsense

Friday, March 27, 2020

आजची सकाळ

सकाळी सकाळी उठून जरा घराबाहेर पडून  काय चाललंय बघूया म्हणून दार उघडलं तर काय आश्चर्य दारात छत्रपती शिवाजी महाराज उभे . त्यांनी माझ्यावर तलवार रोखली आणि म्हणाले खबरदार जर घराबाहेर पडलास तर शत्रू महाभयंकर आहे . सध्या फक्त गनिमी कावा . मी घाबरून महाराजांना मुजरा करून दार लावून घेतलं . रोगाच्या भयाने त्रस्त झालो अस्वस्थ झालो . तितक्यात बाबा आमटे आले माझ्याबाजूला . सोफ्यावर बसले .  त्यांनी मायेने हाथ फिरवला आणि म्हणाले अरे रोगाला घाबरून काय होणार आहे . फक्त त्याला नीट जाणून घेता आलं म्हणजे मिळवलं . मला थोडं हायसं वाटलं . मी म्हटलं तुम्ही असायला हवे होतात बाबा आता . ते म्हणाले मी नसलो तरी माझ्या विचारांनी प्रेरित झालेली माणसं आहेत कि डॉक्टर आणि सेवकाच्या रूपात . तू बिनधास्त रहा . फक्तं त्यांच्यावरचा भार वाढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या . असं म्हणून बाबा आमटे गुप्त झाले . आता २१ दिवस घरी बसून काय करायचं याचा मी विचार करत होतो तोच गाडगे महाराजांनी मला झाडू ने झोड झोडलं . म्हणाले अरे मी ओरडून ओरडून सांगितलं रे कचरा साफ करा मनाचा आणि परिसराचा .. केलीत ना घाण . आता निदान तू तुझ्या घरातला तरी कचरा काढ . बाहेरचा  कचरा काढणारी माणसं राबतायत तुमच्या साठी तुम्ही कचरा केला नाहीत तरी पुष्कळ ..गुमान झाडू घेतली आणि कचरा काढायला लागलो . तितक्यात सावरकर आले म्हणाले आता कळलं कैद म्हणजे काय असते . पण घाबरू नकोस या कठीण काळात  तू तुझ्यातल्या लेखणीला आणि विचारांना खतपाणी घाल .. २१ काय ५० दिवस पण सहज जातील . मी त्यांना विचारलं पण खाण्याचं काय तितक्यात गांधीजी आले म्हणाले गरजा कमी कर आवश्यक तेवढंच खा . आणि सावरकर गांधीजी एकत्र हसत हसत निघून गेले . मला कळलं नाही मग आम्ही का भांडतोय आजही यांच्या नावाने .मला कळलं हाच तो काळ शहाणं होण्याचा . मी खिडकीत जाऊन त्यांचे आभार मानावे म्हटलं तर . दाभोळकर खिडकीत उभे त्यांनी मला बंदुकीची गोळी काढून दाखवली म्हणाले हीच ती अविवेकाची गोळी . तू विवेक घालवून बसू नकोस विज्ञानावर विश्वास ठेव एक दिवस नकीच यातून मार्ग काढशील .

मी म्हटलं चला आता या एकवीस दिवसात यांच्या विचारांची सोबत मला नकीच साथ देईल …   

महेंद्र तुकाराम कदम .

Tuesday, March 24, 2020

पुस्तके

कोणाला घरी करमत नसेल तरी खालील लिंक चा वापर करा आणि पुस्तके वाचा. पण अजिबात घरा बाहेर नका पडू. काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या परिवाराची.

1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जंजिरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

*तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल*

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

Monday, March 23, 2020

लहान होत तेच बर होत....

*लहान होत तेच बर होत....*
लहान होत तेच बर होत,
ना कशाची काळजी,ना कशाची चिंता होती
बॅट- बॉल, विटी- दांडू हीच आमची दुनिया होती....🤗

ना मनात पाप,ना शिक्षणाचं ओझ    होत,
मोठ होऊन काय व्हायचंय हे तेव्हा कुणी ठरवल होत,😅
नेहमी वाटायचं मोठ व्हावं मोठ्यांसारख वागावं
पण आता कळतंय, लहान होत तेच बर होत....😔

वय वाढलं,ओझ वाढलं दबला खाली खांदा
दबलेल्या खांद्याखाली बालपणाचा पार चुराडा झाला,
मोठ होऊन जर अपेक्षा पूर्ण करण्याचं काम होत,
तर लहान होत तेच बर होत...😔

या धावपळीच्या जीवनात त्या आठवणी पुन्हा ताज्या होतायेत
जेव्हा आम्हाला काही काम नव्हतं🙃
आता वाटतंय *लहान होत तेच बर होत....* 😔
  - ओंकार वाघ(बारामती)







स्वर्ग आणि नरक

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
चमचा तोंडा पर्यंत पोहचतच नव्हता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
" लांब दांड्याच्या चमच्याने स्वतः खाता आले नाही तरी दुसऱ्याला भरवता येते
या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत "

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील...
👍👍👍

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...